बाजी पासलकर....


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या सोबत मिसरु ही न फुटलेली तरुण पोर होती  आणि सोबतच एक 65 वर्षाचा तरुण शिवबान सोबत स्वराज्यासाठी पुढे आला होता त्यांचे नाव बाजी पासलकर . 
बाजी पासलकर हे मुसे मावळखोऱ्याचे वतनदार 84 खेडी त्यांच्या अखत्यारीत होत्या अतयंत शूर असलेले बाजी न्यायदानात ही  उत्तम होते.
बाजींनी खेड्या खेड्यात जाऊन  स्वराज्यासाठी बारा मावळातील रयते कडे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची संकल्पना समजावून स्वराज्या साठी प्राण देणारे जिगरबाज मावळे त्यार केले.
छत्रपती त्यांना आदराने बाजी काका म्हणत ते स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते  तोरणा  सुभानमंगळ रोहिडा असे किल्ले त्यांनी लढाई करून जिंकले विजापूर मध्ये ही खबर कळताच सण 1648 मध्ये त्यांनी फतेखानास  धाडले फतेखानाने जेजुरी जवळ बेलसर येथे आपला तळ ठोकला होता स्वराज्यावर संकट आले होते . सुभानमंगळ मराठयांच्या हातून गेला होता स्वराजाचा हा पहिला पराभव होता
छत्रपतींनी कावजी म्हलारस सुभानमंगळ वर धाडले एका दिवसात किला परत स्वराजत सामील झाला  बाजी पासलकर यांना फते खानवर चालून जाण्यास सांगितले
 लढताना एक घाव बाजी पासलकरांच्या पाठीमागून त्यांच्या समशेरधारी उजव्या हातावर झाला. वेदनेने कळवळलेले बाजी त्या वार करणाऱ्याचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गनिमाची तलवार त्यांच्या छातीवर उतरली. पासष्ट वर्षांचे बाजी पडले. आपले काम फत्ते झाले हे लक्षात येताच फत्तेखान आपल्या सैन्यासह परत मागे वळून पळून गेला.
कावजी मल्हारला हे समजताच तो तीरासारखा सासवडला धावला. आपल्या धन्याचे जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दु:खाची जात एकच होती.
पुरंदर किल्ला येईतो बाजींनी शरीरातली धुगधुगी फक्त आपल्या शिवरायांना पहाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवली होती. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेले कोकरू आपल्या आईला-गोमातेला बघताच धावत सुटते तसे राजे पालखीकडे धावले. शिवाजीच्या मांडीवर डोके ठेवून बाजी पासलकरांनी प्राण सोडला.. त्यादिवशी २४ मे १६४९ ही तारीख होती.
मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला, पण बाजी पासलकर यांच्यासारखा वीर रणी पडला.
बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला.
वीर बाजी पासलकर (देशमुख) हे हिंदवी स्वराज्यासाठी पहिले बलिदान देणारे वीर होते.

Post a Comment

0 Comments